Wednesday, November 16, 2011
किल्ले हातगङ
गडावर प्रवेश करण्यापूर्वी चार दरवाजे लागतात.पहिल्या दरवाज्याच्या अगोदरच उजवीकडे कातळात वरच्या भागात कोरलेले पाण्याचे टाके लागते.येथेच कातळात कोरलेली हनुमानाची मूर्ती आहे.गडाच्या पहिल्या दरवाज्याचे फक्त खांब शिल्लक आहेत.या दरवाज्याजवळच दोन शिलालेख कोरलेले आहेत.या दरवाज्यातून थोडे वर चढल्यावर आपण दुस-या संपूर्ण कातळातून खोदलेल्या बोगा सारख्या दरवाज्यातून आत शिरतो.या दरवाज्याला पाहून हरीहर किल्ल्याची आठवण येते.या दरवाज्याच्या बाजूला एक गुहासुध्दा कोरलेली आहे यात पाण्याची तीन टाकी आहेत.या दरवाज्यातून थोडे वर गेल्यावर गडाचा तिसरा आणि चौथा दरवाजा लागतो.गडमाथा खूप विस्तीर्ण आहे.संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो.दरवाज्यातून वर आल्यावर पाय-यांची एक वाट डावीकडे खाली उतरते.येथे मोठा प्रमाणावर तटबंदी आहे.ती आजही ब-यापैकी शाबूत आहे.समोरच एक पीर सुध्दा आहे.उजव्याबाजूच्या तटात एक कमान कोरलेली आहे ,पाण्याचे एक टाके सुध्दा आहे.हे सर्व पाहून आल्या वाटेने परतावे.आता दरावाज्याच्या उजवीकडची वाट धरावी.येथून थोडे वर गेल्यावर पाण्याचे टाके लागते थोडे अजून वर गेल्यावर पडक्या इमारतींचे अवशेष लागतात.येथे एक बुरुज वजा इमारतही आहे. थोडे खाली उरल्यावर पाण्याचा एक तलाव सुध्दा आहे.यामधील पाणी पिण्यास अयोग्य आहे.तलावाच्या समोरच किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.किल्ल्याचे मोठे पठार देखील आहे.किल्ल्याच्या या भागाची तटबंदी अजूनही शाबूत आहे.तलावाच्या वरच्या बाजूस एक ध्वजस्तंभ आहे.ध्वजस्तंभाच्या पुढे एक वाट गडाच्या दुस-या टोकाला जाते.वाटेत पाण्याची अनेक टाकी लागात. गडाच्या दुस-या टोकाला एक बुरुज आहे.संपूर्ण गडफेरीस एक तास पुरतो.असा हा हातगड नाशिक पासून १०० कि.मी वर आहे .नाशिकवरून एका दिवसात सहज पाहून होतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment