Pages

Thursday, April 21, 2011

किल्ले सुधागड

 
          दीपक बरोबर केलेल्या सर्व ट्रेक मला चागंलेच आठवणीत राहिले आहेत.दीपक आणि मी या अगोदर राजमाची,सिंहगड भटकंती केलि आहे.सर्वात प्रथम गडाची ओळख करून देतो.सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत.
           सुधागड हा किल्ला फार प्राचीन आहे. या परिसरात अस्तित्वात असणारी ठाणाळे लेणी, ही २२०० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे अनुमान निघते की सुधागड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली. इ. स. १६४८ साली हा किल्ला स्वराज्यात सामील झाला. याबाबत असा उल्लेख आढळतो की, 'साखरदर्यात मालवजी नाईक कारके यांनी माळ लाविली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. या धारकर्यांना उभे करून त्यांचे पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारिली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावरी गेले तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाणहाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.' शिवरायांनी या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले
         गडाच्या पायथ्याशी असलेल्या 'पाच्छापूर' या गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा अकबर याची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस, त्याचा मुलगा आवजी बल्लाळ,आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणार्या परली गावात हत्तीच्या पायी दिले.

या गडाचा घेरा मोठा आहे.गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात.गडावर पंत सचिवांचा वाडा आहे.तसेच भोराई देवीचे मंदिर आहे. येथे जंगलही ब-यापैकी आहे. आजुबाजूच्या जंगलाच्या परिसरात अनेक प्रकारची औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात . जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाट ही आपणांस चोर दरवाज्यांकडे जाते. ही वाट मात्र आता अस्तित्वात नाही.
·    पाच्छापूर दरवाजा : या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे मंदिर ,तसेच धान्यकोठारं,भाडांचे टाके,हवालदार तळे , हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते.
·    गडावरील टकमक टोक : वाडापासून आपण पाय-यांच्या साह्याने वर आले की उजवीकडची वाट पकडावी. ही वाट मात्र हत्तीपागां मधून जाते.या वाटेने आपण सरळ एका टोकावर पोहचतो. या टोकाकडे आपण पाहिल्यावर आपल्याला रायगडावरील 'टकमक' टोकाची आठवण येते. या टोकावर उभे राहिल्यावर समोरच अंबा नदी व नदीच्या आजुबाजूची गावे हा परिसर दिसतो.
·    दिंडी दरवाजा : सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. गडावर वाडाच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत.त्यावर सुबक नक्षीकाम आहे.
गडावर जाण्याच्या वाटा
·    सवाष्णीचा घाट : तैलबैला गावातून सरळ धोंडसे या गावी यावे. अथवा पाली गाव ते धोंडसे गाव हे अंतरही १२ कि।मी। आहे। पालीहून धोंडसे गावी यावे।तिथून गडावर जाण्यासाठी ३ तास लागतात।या वाटेने आपण दिंडी दरवाजात येतो।
       हे सर्व काहि मी वाचले होते . सुधागड़ हा मुंबई पासून १५० की मिटर अंतरावर आहे .माजी कार {टाटा सुमो विकटा}घेऊन रात्रि निघालो मी जरा कामत असल्या कारणाने मला वेळ माहित नाही .मला उशीर झाला होता दीपक आणि त्याचे मित्र माजी वाट पाहत होते.मी गाडी घेऊन पोहचलो आणि दीपक ने सर्वाचा परिचय करुन दिला .मग आम्ही निघालो लवकर पोचल्या कारणाने आराम करायला आम्ही आरामगृह पहात होतो . कुठेही जागा खाली नव्हती या कारणाने सर्वाना गाडीत झोपावे लागले .सकाळी एका गाव करयाने गाडीची काच ठोठावत आम्हाला जागेकले आणि सांगितले की गाडीचे चाक पंचर झाले आहे .आम्ही सर्वजण झोपेत होतो आणि बाहेर भरपूर पाउस पडत होता .मला गाडीचे चाक बदली करायला कंनटाळा आला होता.नाइलाजाने   आम्ही सर्वानी ते चाक बदली केले पंचार झालेले चाक दुरुस्त करण्या मध्ये किमान एक दीड तास तिकडेच गेला असावा ते काम करून मग एका छोट्याशा हॉटेल मध्ये चहा नास्ता केला आणि त्याला सुधागड़ अजून किती अंतरावर आहे विचारले त्यावर तो म्हणाला कि तिथून अंदाजे २२ किलोमीटर असेल असे सागितले आणि  सर्वजण सुधागड़ कड़े निघालो.रस्ता शोधत सर्वजण ठाकुरवाडी या गावामधे पोहचलो .गाडी  एका जुन्या पडक्या शाळे पाशी उभी केली.
सर्वांनी आप आपल्या ब्यागा काढून घेतल्या आणि मी गाडी लॉक झाली आहे कि नाही ती खात्री करून घेतली. बाहेर थोडा थोड पाऊस चालूच होता.मग तिथेच येका गावकऱ्याला गडाकडे जाण्याची वाट विचारली.मग त्याच वाटेने गडाच्या दिशेने निघलो थोडेसे गावातून जावे लागते पण गाव अगदी शांत आणि त्यांची ती मातीची घरे आणि राहणीमान पाहून मला माझ्या गावाची फार आठवण येत होती माझे हि गाव असेच शहरा पासून दूर डोंगराच्या कुशीत वसलेले आहे असो तो एक वेगळा विषय आहे. गावातून थोडेसे बाहेर आल्यावर गड चढायला सुरवात केली.सुरवातीची वाट हि सरळच होती आम्ही येक मेक बरोबर बोलत चालत होतो.अनु आणि आशु  हे दोघे हि माझासाठी अनोळखे होते यामुळे त्या मध्ये मिसळायला मला थोडा वेळच लागला कारण यापृवी आमची कधी भेट झाली नव्हती.एका मळलेल्या वाटेने सरळ सरळ चालत होतो. गडाचा पहिला टप्पा पार करताना एक लोखंडाची सिडी लागते त्यावर बसून फोटो कडून झाल्यावर पुढे निघलो.
 
    गडा वरून वाहणारे पाण्याचे झरे आमची  तहान भागवत होते आणि ते पाणी तोंडावर मारले कि सारा थकवा गीघून जायचा.धबधब्यांचा खळखळात आणि पक्षांचा आवज ऐकून फार छान वाटत होते.
धुके जास्त असल्या कारणाने अजून गड किती लांब आहे याचा अंदाजही येत नव्हता आणि त्यावर पाऊस आपल्या मूड प्रमाणे पडत होता. रानातून वाट काढत काढत आम्ही पुढे सरकत होतो कुठे कुठे गडाचा काही भाग कोसळलेले होता हे पाहून मनाला फार वाईट हि वाटत होते.पण काय करणार शिवरायांनी आपल्यासाठी एवडे काही केले आपण त्यांच्या साठी काहीच करू शकत नाही याचे दु:ख होत होते.पाऊस पडतच होता आणि अनुने आणलेली चॉकलेट खात खात पुढे निघत आम्ही गडाच्या अर्ध्या रस्त्या पर्यंत येऊन पोहचलो गडाचा दुसरा टप्पा हि पार झाला पण शेवटचा टप्पा हा जरा कठीण होता कारण गडाच्या पायऱ्या कोसळल्या होत्या यामुळे जरा जपून चालावे लागत होते.



गडाची तटबंदी आता स्पष्ट दिसत होती गडाच्या,किल्ला एका तासात सर केला होता.

No comments:

Post a Comment